Nawab Malik | ‘गल्लीत क्रिकेट जिंकणारे वर्ल्डकप जिंकू म्हणतायेत’ – नवाब मलिक

| Updated on: Jan 01, 2022 | 12:30 PM

विरोधकांनी केलेल्या आरपोंना तेवढ्याच क्षमतेने तोंड देणारे अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी विरोधकांवर घणाघाती टीका केली असून नव्या वर्षात अनेक घोटाळे समोर आणणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.

Follow us on

मुंबई :  सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक भाजपने जिंकली. महाविकास आघाडीला हा मोठा धक्का मानला जातोय. भाजपच्या याच विजयाबद्दल बोलताना नवाब मलिक यांनी चांगलीच टोलेबाजी केलीय. गल्लीत क्रिकेट जिंकणाऱे वर्ल्ड कप जिंकू असे म्हणत आहेत, असं म्हणत मलिक यांनी नारायण राणे तसेच भाजपला खिजवलं आहे. तसेच विरोधकांनी केलेल्या आरपोंना तेवढ्याच क्षमतेने तोंड देणारे अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी विरोधकांवर घणाघाती टीका केली असून नव्या वर्षात अनेक घोटाळे समोर आणणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.