हा विजय कवठे महांकाळ(Kavathe Mahankal)च्या सर्वसामान्य जनतेचा असल्याची प्रतिक्रिया विजयानंतर रोहित पाटील (Rohit Patil) यांनी दिली आहे. आरआर पाटील यांच्या स्मृतीस्थळी नतमस्तक झाल्यानंतर त्यांनी हे मत व्यक्त केलं. सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन आम्ही गेलो. निवडणूक विकासाच्या मुद्द्यांवर लढलो. त्यामुळे लोकांचा आमच्यावरचा विश्वास वाढला. पक्ष म्हणून आमच्या सर्व नेत्यांनी सहकार्य केलं, असंही ते यावेळी म्हणाले.