‘लवकरच महाराष्ट्राला हाणामारीचे मंत्रिमंडळ पहायला मिळणार’, कुणी केला थेट दावा?

| Updated on: Jun 09, 2023 | 7:34 AM

VIDEO | 'नैतिकता असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा', कुणी केली मागणी?

Follow us on

अकोला : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणतात की, येणाऱ्या तीन महिन्यानंतर हे सरकार कोसळणार. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार मिटकरी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. येत्या तीन महिन्यात नाही तर विस्तारानंतरच दुसऱ्या दिवशी हाणामाऱ्या सुरु होतील, असा दावाच त्यांनी केला तर शिंदे सरकार आणि फडणवीस सरकारकडे सात सात मंत्रिपद असल्याने लवकरच महाराष्ट्राला हाणामारीचे मंत्रिमंडळ पहायला मिळणार असल्याचे म्हणत अमोल मिटकरी यांनी सडकून टीका करत खोचक टोलाही लगावला आहे. महाराष्ट्रातील एकंदरीत तणावाची परिस्थिती पाहता याची नैतिक जबाबदारी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेऊन तात्काळ राजीनामा द्यावा. आपण गृहमंत्री म्हणून सपशेल अपयशी ठरलात. महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश करण्याचा भाजपचा डाव असल्याचे म्हणत अमोल मिटकरी यांनी भाजपसह देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.