मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाचा आणि महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर येत आहे. याबद्दलचे भाष्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपासंदर्भातील कोणतीही बैठक झालेली नाही. त्यामुळे ही अफवा असल्याचे नाना पटोले यांनी सांगत मोठा खुलासा केला आहे. ते असेही म्हणाले, भाजप आणि सत्ताधाऱ्यांनी काहीही करो, काहीच हाती लागणार नाही. कोणी किती आणि कसंही वातावरण तयार केलं तरी महाराष्ट्रात त्यांना सत्तेच्या बाहेर जावं लागेल असं चित्र निर्माण झाल्याचं नाना पटोले यांनी सांगत विरोधकांना खोचक टोलाही लगावला आहे.