BJP’s Jal Aakrosh Morcha | भाजपच्या जल आक्रोश मोर्चात फक्त 5 हजार लोक सहभागी

| Updated on: May 24, 2022 | 2:39 PM

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वात औरंगाबादमध्ये जल आक्रोश मोर्चाचं (Jal Akrosh Morcha) आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्च्यात फक्त पाच हजार लोकांनी या मोर्च्यात सहभाग घेतला. खुर्च्या रिकाम्या होत्या. - चंद्रकांत खैरे

Follow us on

महाराष्ट्रा मध्ये राज्य सभेच्या सहाव्या जागेचा घोळ अजूनही सुरू आहे. माजी खासदार चंद्रकांत खौरे यांच्याशी संवाद साधला आहे. आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी. चंद्रकांत खैरे याचं देखील नाव चर्चेत होतं. आता संभाजी राजे असं म्हणत आहेत. आमचं ठरलेलं आहे मी मुंबईला निघालो आहे. यावर उत्तर देताना चंद्रकांत खैरे म्हणाले आहेत. नावं जरी चर्चेत असली तरी शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जे म्हणतील ते होईल. आम्हाला याबाबत काही वाटत नाही. आम्ही शिवसैनिक आहोत. ते जे करतील ते चांगलंच करतील. काल औरंगाबाद मध्ये एक मोठा मोर्चा निघाला देवेंद्र फडणवीसांनी या मोर्च्यांचं नेतृत्व केलं असा प्रश्न चंद्रकांत खैरे ना विचारला असतान. फक्त पाच हजार लोकांनी या मोर्च्यात सहभाग घेतला. खुर्च्या रिकाम्या होत्या.