मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांच्या बरोबरची चर्चा निष्फळ ठरली आहे. त्यामुळे इतक्या दिवसांच्या चर्चेतून काही फायदा झालेला नाही. आम्ही वंचित बहुजन आघाडीला पाच जागांची ऑफर दिली होती असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. तर आमच्याकडे केवळ तीन जागांचा प्रस्ताव आला होता असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. एक जागा आमची पारंपारिक अकोला आणि दोन इतर जागा असे आंबेडकर यांनी म्हटले आहे. मविआ आणि संजय राऊत हे वेग- वेगळे आहेत. संजय राऊत महाविकास आघाडीत बिघाडी करीत आहेत असा थेट आरोप प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. तर आम्ही आजही आंबेडकरांनी आमच्यासोबत रहावे अशी मागणी करीत असल्याचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.