मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल 400…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26 जुलै 2026 रोजी ‘विकसित व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम 2026’ अंतर्गत 400 हून अधिक तरुण आणि विद्यार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. ‘MY Bharat’ पोर्टलच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचा उद्देश सीमावर्ती गावांचा सर्वांगीण विकास आणि युवकांचा सहभाग वाढवणे हा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26 जुलै 2026 रोजी ‘विकसित व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम 2026’ अंतर्गत 400 हून अधिक तरुण आणि विद्यार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. ‘MY Bharat’ पोर्टलच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचा उद्देश सीमावर्ती गावांचा सर्वांगीण विकास आणि युवकांचा सहभाग वाढवणे हा आहे.
देशभरातील ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धेत 3 लाखांहून अधिक तरुणांनी सहभाग घेतला. त्यातून 400 हून अधिक युवकांची निवड करण्यात आली. या सहभागी तरुणांनी लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील 74 सीमावर्ती गावांना भेट देऊन तेथील परिस्थिती जवळून जाणून घेतली.
या दौऱ्यात युवकांनी स्वच्छता मोहिमा, वृक्षारोपण, शासकीय योजनांची जनजागृती आणि स्थानिक नागरिकांशी संवाद अशा विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला. त्यामुळे गावांच्या विकासासाठी युवकांची भूमिका अधिक मजबूत होत असल्याचे दिसून आले.
या कार्यक्रमात सीमावर्ती भागातील कनेक्टिव्हिटी, पायाभूत सुविधा आणि नागरिकांचे जीवनमान उंचावण्यावर विशेष भर देण्यात आला. तसेच पर्यटन, कौशल्य विकास आणि उद्योजकतेला चालना देऊन ही गावे स्वयंपूर्ण आणि सक्षम करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.
