अजितदादांनीच माझं सरकार पाडलं; पृथ्वीराज चव्हाण यांच्या आरोपानं खळबळ

Harshada Shinkar | Updated on: Oct 30, 2024 | 1:51 PM

अजित पवार यांची काल सांगलीतील तासगाव येथे सभा पार पडली. या सभेत अजित पवार यांनी राज्याचे दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर मोठे आणि गंभीर आरोप केल्याचे पाहायला मिळाले.

“माझ्यावर आरोप झाले. मला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. म्हणाले, याच्यावर 70 हजार कोटींचा आरोप करुयात. अजितराव घोरपडे त्या खात्याचे मंत्री होते. माझ्यावर ज्यादिवशी आरोप झाला तेव्हापासून महाराष्ट्राची 1 मे 1960 ला निर्मिती होऊन ते आरोपाच्या दिवसापर्यंत पगाराचा आणि सगळा खर्च 42 हजार कोटींचा झाला आणि मला 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार केला म्हणाला. त्यातून एक फाईल निर्माण झाली. ती फाईल गृह खात्याला जाते. त्याने त्या फाईलीवर अजित पवारांची उघड चौकशी करावी म्हणून सही केली. केसाने गळा कापायचे धंदे आहेत”, असे म्हणत अजित पवारांनी धक्कादायक आरोप केला. यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सिंचन घोटाळा हा काय अजित पवार यांची पाठ सोडत नाही. मी जेव्हा सिंचनाची श्वेतपत्रिका काढण्याचा आदेश सिंचन खात्याला दिला होता. मी माझ्या कार्यकाळात कधीच 70 कोटींचा घोटाळा हा शब्द वापरला नव्हता. ती फाईल माझ्याकडे आली नाही. माझी कुठल्याही फाईलवर सही नाही. त्यामुळे सिंचन घोटाळ्यात मी चौकशी लावली नव्हती, माझा नाहक बळी घेतला आणि 2014 साली अजित पवार यांनी माझं सरकार पाडलं आणि भाजपच्या राजवटीची मुहूर्तमेढ केली, असं धक्कादायक वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं.

Published on: Oct 30, 2024 1:51 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us