पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात एक हत्याकांड समोर आलं आहे. दौंडच्या यवतमध्ये सात जणांची हत्या झाल्याचं उघड झालं आहे. भीमा नदीच्या पात्रात क्रूर हत्याकांड झालं असल्याची माहिती आहे. यवतमधल्या सात मृतदेहाच गूढ उकललं. या सात जणांची हत्या कौटुंबिक वादातून झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपींच्या भावावर करणी केल्याच्या संशयातून हत्या झाल्याची माहिती आहे. सगळा प्रकार अंधश्रद्धेतून झाल्याचा अंदाज आहे.