तोंडातून रक्त येत होतं अन्… स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?

तोंडातून रक्त येत होतं अन्… स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?

| Updated on: Jul 22, 2026 | 5:38 PM

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले. नीट पेपर फुटी तसेच देशातील शिक्षणव्यवस्थेवर राहुल गांधी यांनी बोट ठेवले आहे. सोबतच त्यांनी काल पोलिसांनी ताब्यात घेतलं तेव्हाचा प्रकर सांगितला.

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले. नीट पेपर फुटी तसेच देशातील शिक्षणव्यवस्थेवर राहुल गांधी यांनी बोट ठेवले आहे. सोबतच त्यांनी काल पोलिसांनी ताब्यात घेतलं तेव्हाचा प्रकर सांगितला.

कॉकरोच जनता पार्टीच्या दिल्लीतील आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत आहे. काहीही झालं तरी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा झालाच पाहिजे, अशी ठाम भूमिका सीजेपीची आहे. काँग्रेसनेही हा मुद्दा चांगलाच लावून धरला आहे. 21 जुलै रोजी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोरच साडे तीन तास ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर आता राहुल गांधी यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारला घेरलं आहे. यावेळी त्यांनी सांगितलं की, “पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करताना पोलिसांनी ताब्यात घेतलं माझ्या तोंडातून रक्त येत होतं… फरफटत न्हेलं.” सध्या त्यांच्या या विधानाची सर्वत्र चर्चा आहे.

Published on: Jul 22, 2026 5:22 PM
Follow Us