राज्यात चालू भोंग्यावरुन चालू झालेले राजकारण आता ठाकरे घराण्याच्या भावकीवर आले आहे. जुने वाद उखरुन काढून अगदी बाळासाहेब ठाकरेंपासून ते अगदी शरद पवार आणि अजित पवार यांच्यापर्यंत येऊन ठेपला आहे. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना सोडून गेल्यापासून ते अगदी बाळासाहेब आजारी पडेपर्यंतच्या घडामोडींचा व्हिडीओंनी आता ठाकरेंच्या भावकीचे वाद आता पुन्हा एकदा उफाळून आले आहेत. राज ठाकरेंनी शिवसेना सोडून गेल्यापासून ते आतापर्यंत त्यांच्या राजकीय भूमिकांचे सगळे हिशोबही शिवसेनेचे नेते मांडत आहेत. त्यामुळे आता हा वाद कुठपर्यंत जाणार हे येणारा काळच ठरवणार आहे.