सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी विधान परिषद निवडणुकीसाठी (Legislative Council Election) अपक्ष अर्ज दाखल केला होता. तो निवडणूक अर्ज सदाभाऊ खोत यांनी मागे घेतला. तसंच शिवाजीराव गर्जे यांनी राष्ट्रवादीकडून डमी अर्ज भरलेला होता तोही अर्ज आता मागे घेण्यात आला आहे. पण काँग्रेसने आपला अर्ज मागे न घेतला नाही. जर दोन्ही बाजूने पाच-पाच उमेदवार असते तर ही निवडणूक बिनविरोध झाली असती. पण काँग्रेसने आपला उमेदवार मागे घेतला नाही. त्यामुळे ही निवडणूक मविओचे 6 उमेदवार विरूद्ध भाजपचे 5 उमेदवार अशी रंगणार आहे.