मुंबई : कडक निर्बंध आणि नागरिकांकडून कोरोना नियमांचे पालन या दोन गोष्टी होत असल्यामुळे सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसतेय. रुग्णांची संख्या कमी होत असल्यामुळे कोरोनाची दुसरी लाट लवकरच ओसरेल असे अंदाज बांधले जात आहेत. सध्या कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असल्यामुळे शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतूक करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. त्याविषयीच हा स्पेशल रिपोर्ट…