Video | भीषण अपघात! इथेनॉलने भरलेल्या ट्रकची कारला धडक, एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत
समृद्धी महामार्गावर वर्धा जिल्ह्यातील विरुळ गावाजवळ भीषण अपघात झाला असून या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1 जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघाताचा तपास सुरू केला आहे.
समृद्धी महामार्गावर वर्धा जिल्ह्यातील विरुळ गावाजवळ भीषण अपघात झाला असून या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1 जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघाताचा तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री समृद्धी महामार्गावर इथेनॉल घेऊन जाणारा टँकर उलटल्याने काही काळ वाहतुकीत बदल करण्यात आला होता. त्याचदरम्यान विरुळ गावाजवळ भरधाव मालवाहू वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटले. हे वाहन समोरून येणाऱ्या कारवर जाऊन आदळले. धडक इतकी जोरदार होती की कारने काही क्षणांत पेट घेतला. आगीने संपूर्ण कार वेढल्यामुळे आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही.
या भीषण आगीत कारमधील 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. तसेच मालवाहू वाहनातील 1 व्यक्तीचाही मृत्यू झाला. अन्य 1 जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर अग्निशमन दल, पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले. या घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
