सांगली : सांगलीतील कृष्णा नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा सध्या ऐरणीवर आलाय. यावर स्वाभिमनानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी भाष्य केलंय. त्यांनी सांगलीकरांचं अभिनंदन केलं आहे. तर सरकारलाही सल्ला दिलाय. “कृष्णा नदीचा प्रदूषणाच्या विषयावर सर्व सांगलीकर आज रस्त्यावर आले. त्याबद्दल मी सर्व सांगलीकरांचं अभिनंदन करतो. सरकारनं वेळेत शहाणा व्हावं आणि कृष्णा नदीचं प्रदूषण ताबडतोब थांबवावं, असं मत माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगली व्यक्त केलं. राजू शेट्टी यांच्याशी बातचीत केले आहे आमचे प्रतिनिधी शंकर देवकुळे यांनी. पाहा…