मुंबई : मागील अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी सरकार हे जास्त दिवस टिकरणार नाही, असे भाकीत भापजकडून केले जाते. मात्र, यावेळी भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांनी उद्धव ठाकरे यांची घुसमट होत असल्याचा दावा केला. तसेच ते आघाडीतून नक्की बाहेर पडतील असा विश्वाससुद्धा त्यांनी व्यक्त केला. काकडेंच्या या विधानानंतर राज्यात खळबळ उडाली. याच निमित्ताने, महाविकास आघाडी सरकार पूर्ण काळ टिकेल का असे प्रश्न विचारले जात आहेत. त्याविषयीच हा स्पेशल रिपोर्ट…