शिंदे गटाचे आमदार संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला. तसंच मातोश्रीचं उघल्यास परत जाण्याचंही त्यांनी बोलून दाखवलं. दारव्हा मतदारसंघातील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात संजय राठोड आले होते. त्यांनी यावेळी बंडखोर करण्यामागचं कारण कार्यकर्त्यांशी बोलताना स्पष्ट केलं.संजय राऊतांमुळे ही वेळ आल्याचे आमदार राठोड यांनी सांगितलं.तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पुतळा जाळून त्यांच्या घरावर दगडफेक केल्यानं हे सर्व गोष्टी घडल्याचं त्यांनी सांगितलं. मातोश्रीचं दार पुन्हा आमच्यासाठी उघडल्यास मी पुन्हा मातोश्रीवर जाईल. उद्धवसाहेबांशी बातचित करेन, असं देखील त्यांनी म्हटलंय.