संजय राऊत मागच्या काही दिवसांपासून भाजपच्या नेत्यांवरती सडकून टीका करीत आहेत. आज त्यांनी भाजपाने शिवसेना पक्ष का फो़डला याची कारणे देखील सांगितली आहेत. तसेच भाजपने ही तात्परती व्यवस्था केली. मध्यावधी निवडणुका होणार असल्याचे सुचक वक्तव्य देखील त्यांनी केले आहे. त्यामुळे आज होणाऱ्या घडामोडीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातल्या राजकारणात एकदम वेगावान घडामोडी घडत आहेत. शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्यापासून शिवसेनेतील नेते अस्थिर झाले आहेत. तसेच शिवसेना नव्याने वाढवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे पुन्हा प्रयत्न करू लागले आहेत.