राज्यातील घडामोडींकडे संपूर्ण देशाचे लक्ष आहे. महाविकास आघाडीची सत्ता उलथवून पाडण्याचे प्रयत्न सुरू झालेत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून वेगळा गट स्थापन केला. या गटात दोन-तृतियांश पेक्षा जास्त आमदार आहेत. शिवाय अपक्षांचा पाठिंबा घेऊन ते भाजपला भेटल्यास नवं सरकार स्थापन करू शकतात. यासाठी अपक्षांशी संपर्क सुरू आहे. तसेच राज्यपाल आणि मुख्यमंत्र्याना कोरोनाची लागण झाली आहे. शरद पवार यांनीही बैठक घेतलीये. संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे कधीही मागून वार करत नाही. राज्यातील सध्याची सर्व परिस्थिती बघता महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. यामुळे राज्यामध्ये नेमके पुढे काय होते हे बघण्यासारखेच ठरणार आहे. अपक्ष आमदारांना देखील आता एकनाथ शिंदे यांच्याकडून संपर्क साधला जातोय.