काँग्रेस नेत्यांनी आज राज्यपालांची भेट घेतली. यावेळी काँग्रेसनेते भाई जगताप, बाळासाहेब थोरात आणि नाना पटोल यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी हँगिंग गार्डन ते राजभवन अशी सायकल रॅली काढण्यात आली होती. यावेळी वाढत्या महागाईविषयी राज्यपालांशी चर्चा झाल्याचे नाना पटोले म्हणाले.या सोबतच लसीकरणाचा मुद्दा देखील मांडण्यात आला. यावेळी ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षण मुद्द्यांवर देखील काही मागण्या करण्यात आल्या आहे. हे निवेदन काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले.