मोठी बतामी! ठाकरेंच्या खासदारांनंतर आता राष्ट्रवादीचे… शरद पवारांनी एका वाक्यातच सांगितलं, आमचा…
शिवसेना ठाकरे गटातील 6 खासदारांनी बंडखोरी करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे स्वतंत्र गटासाठी पत्रही दिले आहे. खासदारांनंतर आता ठाकरे गटातील काही आमदारही शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहे. त्यामुळे ठाकरे गटाने आमदारांची तातडीची बैठक बोलावण्याची तयारी सुरू केली आहे.
शिवसेना ठाकरे गटातील 6 खासदारांनी बंडखोरी करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे स्वतंत्र गटासाठी पत्रही दिले आहे. खासदारांनंतर आता ठाकरे गटातील काही आमदारही शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहे. त्यामुळे ठाकरे गटाने आमदारांची तातडीची बैठक बोलावण्याची तयारी सुरू केली आहे.
दरम्यान, या सर्व घडामोडींनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटही अलर्ट मोडवर गेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदार आणि खासदार बंडखोरीच्या तयारीत असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. यावर आता पहिल्यांदाच शरद पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, “आमचा एकही आमदार कुठे जाणार नाही.” यावेळी त्यांच्या सोबत युगेंद्र पवार देखील होते. शरद पवार यांच्या या विधानामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीच्या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
