उत्तर प्रदेश निवडणूकीत शिवसेना पाच जागांवर विजयी होणार असल्याचे सांगत नवाब मलिकांव झालेली कारवाई ही बोगस असल्याचे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली. शिवसेनेकडून उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक लढविल्यानंतर भाजपकडून शिवसेनेवर जोरदार टीका होत आहेत. त्या टिकेला उत्तर देताना संजय राऊत यांनी सांगितले निवडणुकांचा निकाल लागला की, किती जागांवर आम्ही विजय मिळवू ते कळेल असे सांगितले. यावेळी त्यांनी नवाब मलिकांवर झालेल्या कारवाईबद्दल भाजप सडकून टीका केली. नवाब मलिकांवर झालेली कारवाई ही बोगस असल्याचे सांगितले.