मुंबई : पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात राजकीय दुरावा जरी निर्माण झाला तरी त्यांचे चांगले संबंध आहेत. शिवसेना व मोदी यांचे घरेलू संबंध आहेत. आजही उद्धव ठाकरे यांच्यासाठी ते नरेंद्र भाई आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात हे सरकार 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल. सरकारमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. सरकारमध्ये सर्व व्यवस्थित आहे.