राजकारणात मराठा नेतृत्व पुढं आलेलं उद्धव ठाकरे यांना नको आहे अशी टीका बंडखोर नेते रामदास कदम यांनी केली, त्यानंतर भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही ठाकरे फॅमिलीवर जोरदार टीका करत त्यांनी आरोग्य साथ देत नाही तर तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलात का असा सवालही केली तर दुसरीकडे मात्र किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताच शिवसेनेतून बंडखोरी केलेले आमदार दीपक केसरकर यांनी भाजपच्या नेत्यानी सोमय्यांना समज द्यावी असंही सुनावलं. त्यामुळे आता ठाकरे घराण्याव टीका कमी झाली असली तरी दुसरीकडे मात्र नारायण राणे आणि रामदास कदम यांनी घणाघाती टीका चालूच ठेवली आहे.