मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या एका वक्तव्याने महाविकास आघाडीत चलबिचल सुरु झालंय. पण शिवसेनेकडून सारवासारव सुरु झाल्याचं दिसतंय. मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य म्हणजे भाजपमधील भविष्यातील आऊटगोईंग असल्याचं शिवसेना सांगत आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजप नेते रावसाहेब दानवेंकडे बघून भावी सहकारी म्हटल्यानंतर आता डॅमेज कंट्रोल सुरु झालंय. सरकार पाच वर्षे चालवायचं कमिटमेंट आहे आणि सरकार पाच वर्षे चालेल, असं संजय राऊत म्हणाले आहेत. याच विषयावर सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !