औरंगाबाद : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या औरंगाबाद (Aurangabad) दौऱ्यावर आहेत. यावेळी शिवसेना कायम शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे. शेतकऱ्यांनी घाबरू नये. आत्महत्येचा विचार तर बिल्कुल करू नये, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.शिवाय शेतकऱ्यांचा आवाज होऊन मी रस्त्यावर उतरणार आहे, अशी घोषणाही उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) केली आहे. तसंच प्रति हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्या, असं आवाहनही त्यांनी सरकारला केलं आहे.