भाजप ने गेल्या 4 ते 5 महिन्यापासून भावना गवळी ह्या मतदार संघात नाहीत. लोकांना भेटत नाही यावरून शहरातील एल आय सी चौकात बॅनर लावले होते. या बॅनरची चर्चा वाऱ्यासारखी शहरात पसरताच भावना गवळी समर्थक शिवसैनिकाने त्या ठिकाणहून लगेच बॅनर हटवले. खा. भावना गवळी हरविल्या बाबतची भाजप महिला मोर्चाची पोलिसात तक्रार दाखल झाली आहे. ही तक्ररा यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानंतर भावना गवळी संपर्कात आल्या आहेत. कुठल्याही समस्यांबाबत साधे निवेदन द्यायचे असेल तर आम्ही कोणाला भेटावे? आमचे प्रश्न कोण सोडविणार? असा प्रश्न भाजपकडून उपस्थित केला गेला.