मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात हाहा:कार उडाला आहे. रोज लाखो नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. मध्ये प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांमध्ये कोरोना चांगलाच पसरला आहे. या पार्श्वभूमीवर मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी एक अजब वक्तव्य केलं आहे. त्यांनी काँग्रेसशासित राज्यांवर टीका करण्यासाठी महाराष्ट्राला घेरलं आहे. त्यांनी महाराष्ट्रामुळेच मध्य प्रदेशमध्ये कोरोनाचा फैलाव झाला, असा आरोप केला. त्याविषयीच हा स्पेशल रिपोर्ट