Special Report | 50 खोक्यांबाबत सर्वात पहिल्यांदा कोण बोललं होतं?

| Updated on: Aug 24, 2022 | 11:23 PM

हळूहळू घोषणांची ही स्पर्धा धक्काबुक्कीपर्यंत रंगत गेली. नंतर काही आमदारांनी घोषणाबाजीच्या प्रकाराला दहीहंडीसारखा साहसी खेळ समजून त्यात हिरीरीनं सहभाग घेतला आणि तिथूनच राड्याची सुरुवात झाली.

Follow us on

Special Report | 50 खोक्यांबाबत सर्वात पहिल्यांदा कोण बोललं होतं?-tv9

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या प्रांगणात अभूतपूर्व चित्र होतं. एखाद्या गावात पिक संरक्षक सोसायटीचं इलेक्शन जिंकल्यानंतरच्या मिरवणुकीत जश्या घोषणा होतात, किंवा गल्लीबोळातल्या क्रिकेट टुर्नामेंट जिंकल्यानंतर जल्लोषासाठी जशी स्पर्धा रंगते, तशीच घोषणांची स्पर्धा सत्ताधारी-विरोधकांमध्ये रंगली होती. हळूहळू घोषणांची ही स्पर्धा धक्काबुक्कीपर्यंत रंगत गेली. नंतर काही आमदारांनी घोषणाबाजीच्या प्रकाराला दहीहंडीसारखा साहसी खेळ समजून त्यात हिरीरीनं सहभाग घेतला आणि तिथूनच राड्याची सुरुवात झाली.