मुंबई : मागील अनेक दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावं अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. एसटी बंद असल्यामुळे राज्यात प्रवाशांचे चांगलेच हाल होत आहेत. तर दुसरीकडे महामंडळाला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींच्या सरकारशी बैठका होत आहेत मात्र ठोस तोडगा निघत नाहीये. यामुळे महाराष्ट्र अजून किती दिवस एसटीविना राहील असे विचारले जात आहे.