नवी दिल्ली : अर्थसंकल्प 2023 मध्ये महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती. ही आजपासून मिळणार असून तसा जीआर निघाला आहे. मात्र एकिकडे घोषणा आणि दुसरीकडे एसटी महामंडळाची दुरावस्था अशी स्थिती आहे. यावरूनच उद्धव ठाकरे गटाचे खासदास विनायक राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाना साधला आहे. त्यांनी, राज्य सरकारला एसटीमधील महिला प्रवाशांच्या प्रवासाबाबत फक्त घोषणा करायची होती. अंमलबजावणी करायची नव्हती. महिलांना, जेष्ठांना सवलत दिली चांगली गोष्ट आहे. महाराष्ट्रातील हे एसटी खातं कधीही बुडू शकत. त्यामुळे या एसटी महामंडळाला वाचवणं, सावरणं गरजेच असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.