केंद्राने ‘ती’ मान्य चूक केली; अफवा पसरवण्याचं काम करु नये : मुनगंटीवार

| Updated on: Mar 10, 2023 | 2:21 PM

विरोधकांना राईचा पर्वतच नाही तर राईच्या फोटोचा पर्वत करण्याच्या सवयी या 21व्या शतकात लागलेल्या आहेत

Follow us on

मुंबई : खतं घेण्यासाठी केंद्राकडून शेतकऱ्यांसाठी ई पास मशिन तयार करण्यात आलं आहे. त्यात माहिती भरताना जात टाकावी लागते. यावरून काँग्रेसचे विधान परिषद गटनेते सतेज पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्र सरकावर सडकून टीका. तसेच सभागृहात हा विषय मांडला. त्यावर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहातच विरोधकांवर टीका करत तुमच्या सारख्यांना कारण नसताना संधी मिळू नये आणि चूक झाली असेल तर चूक दुरुस्त ताबडतोब केली पाहिजे म्हणून माझा विषय नसताना मी बाजू मांडत आहे. विरोधकांना राईचा पर्वतच नाही तर राईच्या फोटोचा पर्वत करण्याच्या सवयी या 21व्या शतकात लागलेल्या आहेत. कोणत्याही सरकारने जात निहान खत वाटप असा कोणतीही निर्णय घेतलेला नाही. या चुकीच्या संदर्भात राज्य सरकारकडून मनोज आहुजा कृषी सचिव भारत सरकार यांना कळविण्यात आली आणि ही चूक निश्चितपणे केंद्र सरकारकडून दुरुस्त केल्या जाणार आहे महाराष्ट्राच्या जनतेने याची नोंद घ्यावी