मुंबई : युतीत आम्हाला गुलामासारखी वागणूक मिळाली असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला. सत्तेत असूनसुद्धा शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला असे वक्तव्यही त्यांनी केले. त्यानंतर भाजप नेते यांनी सुधीर मुनगंटीवार यांनी राऊत यांच्या या दाव्याचा समाचार घेतला आहे. लोकशाहीमध्ये कोणीही राजा नाही आणि गुलामही नाही. असे असेल तर शिवसेनेला गुलामीची जाणीव व्हायला पाच वर्षे जावे लागतात का ? असा सवाल मुनगंटीवार यांनी केला.