MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 |

| Updated on: Jul 18, 2021 | 6:43 PM

चेंबूरमध्ये 5 घरं कोसळल्यामुळे एकूण 18 जणांचा मृत्यू झाला आहे. मुसळधार पावसामुळे ही घटना घडली

Follow us on

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 |

1) मुंबईमध्ये मुसळधार पावासामुळे तीन वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये 26 जणांचा मृत्यू झाला आहे.

2) चेंबूरमध्ये 5 घरं कोसळल्यामुळे एकूण 18 जणांचा मृत्यू झाला आहे. मुसळधार पावसामुळे ही घटना घडली.

3) मुंबईत झालेल्या पावसामुळे भांडूप संकूल भागात पाणी साचलं आहे. तसेच पंपिंग स्टेशनमध्येही पाणी शिरलं आहे. यामुळे मुंबईतील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे.

4) मुंबईच्या जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शिरल्यामुळे मालाड, बोरीवली, कांदिवली या भागात अजूनही पाणी आलेले नाही. दरम्यान, मुंबईकरांनी पाणी उकळून प्याव असे आवाहन करण्यात येत आहे.

5) चेंबुरच्या दुर्घटनास्थळी पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी भेट दिली आहे.  मंत्री नवाब मलिक आणि वर्षा गायकवाड यांनी देखील या भागाची पाहणी केली आहे.