SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 3 August 2021

| Updated on: Aug 03, 2021 | 8:40 AM

काही जिल्ह्यांत निर्बंध शिथिल केले असले तरी नागरिकांनी आरोग्याचे नियम पाळावेत आणि कोणत्याही परिस्थितीत मास्क वापरत राहावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

Follow us on

राज्यातील कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणावर असलेल्या 11 जिल्ह्यांत ब्रेक दि चेन अंतर्गत तिसऱ्या पातळीचे निर्बंध 1 कायम ठेवण्यात आले आहे. मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे या 3 जिल्ह्यांत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्बंधांबाबत ठरविणार आहे.

काही जिल्ह्यांत निर्बंध शिथिल केले असले तरी नागरिकांनी आरोग्याचे नियम पाळावेत आणि कोणत्याही परिस्थितीत मास्क वापरत राहावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. ज्या 11 जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या पातळीचे निर्बंध त्यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, अहमदनगर, बीड, रायगड, पालघर यांचा समावेश आहे.