राज्यात अनेक ठिकाणी शेतीसाठी वेळेत पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांची नाराजी आहे. तसेच सध्या राज्यात सुरु भारनियमन विरोधात आमदार दिलीप बोरसे यांच्यासह शेतकऱ्यांचा महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. सटाणा तालुक्यात वारंवार होणाऱ्या भारनियमनमुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. शेतकरी संकटात सापडल्याने तालुक्यातील शेतकरी महावितरणविषयी आक्रमक झाले आहे. वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत करावा यासाठी आमदार दिलीप बोरसेयाच्याह काही शेतकऱ्यांनी अभियंता कार्यालयालात ठिय्या मारला आहे.