नारायण राणे यांनी मार्च महिन्यात महाराष्ट्रातील सरकार नक्की पडेल आणि भाजपचं सरकार येईल यासंदर्भात दावा केलाय. याबाबत विचारणा केल्यानंतर वर्षा गायकवाड यांनी नारायण राणे मार्चमध्ये पुन्हा सरकार येईल म्हणत असतील तर ते यापूर्वी ही भाजपचं सरकार आलं का? असा सवाल वर्षा गायकवाड यांनी केला. केंद्रीय मंत्र्याने असं स्टेटमेंट देताना भान ठेवले पाहिजे, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.
वर्षा गायकवाड यांनी महाराष्ट्रातील एसी कामगारांच्या संपावर देखील भाष्य केलं. सध्या एस टी कामगारांचा संप सुरूच आहे. सरकारने त्यांना पगारवाढ दिली आहे. मंत्री,पालकमंत्री,आमदार आपापल्या भागातील एस टी कामगारांशी संवाद साधत आहेत आणि चर्चेतूनच यावर मार्ग निघणार आहे, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.