पालघर : शिवसेना (Shivsena)आणि केसरी फाउंडेशन (kesari foundation) तर्फे सामूहिक विवाह सोहळ्याचं पालघर (Palghar) मध्ये आयोजन करण्यात आलं होतं. लग्न सोहळ्यादरम्यान मंडपात वादळ शिरलं आणि वऱ्हाड्यांची चांगलीच धावपळ उडाली. लग्नमंडपात वादळ शिरल्याने संपूर्ण लग्नमंडप उध्वस्त झाला. या घटनेत 4 जण किरकोळ जखमी झालेत. जखमींवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत.