शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी माहिती समोर येतेय. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत पावसात खंड पडणार आहे. पुण्यातही काही भागात पावसाची शक्यता नाही. हवामान तज्ज्ञ डॉ. अनुपम कश्यपींनी याबाबतची माहिती दिली. पावसात खंड पडल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी संकट उभं राहण्याची शक्यता आहे. मान्सूनचे अचानक विश्रांती घेतल्याने शेतीची सर्व काम रखडली आहेत, त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात पडण्याची शक्यता आहे. | There Will Be no rain upto Half Of The July dr Anup Kashyapi Gave The Information