Special Report | सभागृहात सबुरीचे धडे…बाहेर फोटोंवरुन युद्ध घडे !

| Updated on: Dec 25, 2021 | 11:19 PM

अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे येताच म्याऊ म्याऊच्या घोषणा देत नक्कल केली. त्यावरुन आता जोरदार राजकारण तापले आहे.

Follow us on

मुंबई : राज्यात सध्या नकला करण्यावरून राजकारण तापले आहे. याची सुरूवात झाली अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी. भास्कर जाधव यांनी पंतप्रधान मोदींची नक्कल केली, त्यानंतर भाजप आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. त्या नकलेचा वाद थांबला नाही तोवर अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे येताच म्याऊ म्याऊच्या घोषणा देत नक्कल केली. त्यावरुन आता जोरदार राजकारण तापले आहे. नितेश राणे यांच्या नकलीला प्रत्युत्तर देत नवाब मलिक यांनी कोंबडीचा फोटो शेअर केला. त्यानंतर आता पुन्हा नितेश राणे यांनी आक्रमक ट्विट केले आहे. तर दुरीकडे नेते एकमेकांना सबुरीचे सल्लेही देत आहेत