Uday Samant On Manoj Jarange Protest : 24 तासात योग्य तो निर्णय घेऊ- उदय सामंत

Uday Samant On Manoj Jarange Protest : 24 तासात योग्य तो निर्णय घेऊ- उदय सामंत

| Updated on: Aug 30, 2026 | 8:39 PM

उदय सामंत यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासंदर्भात महत्त्वपूर्ण विधान केले आहे. विखे पाटील आणि प्रसाद लाड यांच्याशी याबाबत चर्चा सुरू असून, पुढील २४ तासांत यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे सामंत यांनी स्पष्ट केले. परभणी येथे उपमुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असताना एका आंदोलनकर्त्याने घोषणाबाजी केली होती. त्यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता, […]

उदय सामंत यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासंदर्भात महत्त्वपूर्ण विधान केले आहे. विखे पाटील आणि प्रसाद लाड यांच्याशी याबाबत चर्चा सुरू असून, पुढील २४ तासांत यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे सामंत यांनी स्पष्ट केले.

परभणी येथे उपमुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असताना एका आंदोलनकर्त्याने घोषणाबाजी केली होती. त्यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हस्तक्षेप करत, ‘तो माझा माणूस आहे, त्याच्यावर कुठलीही कारवाई करू नका,’ असे आदेश दिले. उपमुख्यमंत्र्यांचा हा संवेदनशील स्वभाव सामंत यांनी अधोरेखित केला. या प्रसंगाचा संदर्भ देत, उदय सामंत यांनी मनोज जरांगे पाटलांना आवाहन केले आहे. कोणाच्यातरी सांगण्यावरून किंवा चुकीच्या माहितीवरून मनोज जरांगे पाटलांनी शिवसेना आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल गैरसमज करून घेऊ नये, असे ते म्हणाले. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सामंत यांचे हे विधान महत्त्वाचे मानले जात आहे.

Published on: Aug 30, 2026 8:39 PM
Follow Us