मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी विविध मागण्यांना घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची आज भेट घेतली. या बैठकीत विविध विषय़ांवर चर्चा करण्यात आली. आठ महिने उलटले तरी अजूनही राज्यपाल नियुक्त आमदांची नियुक्ती झालेली नाही, अशी तक्रार यावेळी नरेंद्र मोदी यांच्याकडे करण्यात आली. तशी माहिती अजित पवार(Ajit Pawar) यांनी दिली.