राज्यात पुन्हा एकदा कोरोना वाढू लागला आहे. टिव्ही 9 चे प्रतिनिधी गजानन उमाटे यांनी संवाद साधला आहे. आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी. नव्या कोणत्याही व्हेरिएंटचा रूग्ण अजून महाराष्ट्रात नाही. कोरोनाचे रूग्ण आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात सापडत आहेत. अशा परिस्थितीत काळजी घेणं हाच त्यावरचा सर्वात महत्वाचा उपाय आहे. सध्या राज्यसरकार कोणतेही नवे निर्बंध लावण्याच्या मनस्थितीत नाही. शाळा सुरू करण्यामध्ये कुठलीही बधंनं नाही. शाळासुरू करावीच लागेल आणि वेळेवर होईल. व्हॉक्सीनेशनचे प्रमाण विद्यार्थ्यांमध्ये वाढविण्याचं काम आम्ही आता करतो आहे. शाळांमध्ये लसीकरणाची मोहीम आम्ही सुरू करणार आहोत. त्यामुळे पालकांना काळजी करण्याची गरज नाही. शाळा सुरू करणं ही आता सर्वात मोठी प्राथमिकता आहे.