एकनाथ शिंदे हे आज भाषण करताना भावुक झाल्याचे दिसले. सभागृहात बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, माझ्या वडीलांनी खुप कष्ट करुन त्यांनी मला इथपर्यंत आणलं. मी घरी जायचो तेव्हा आई-वडील झोपलेले असायचे आणि मी उठण्यापूर्वी ते कामाला निघून घायजे. तेच माझा मुलगा श्रीकांतबाबत घडलं. मी पूर्ण वेळ संघटनेसाठी दिला. मी शिवसैनिक म्हणून जगलो. माझ्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. माझी दोन मुलं गेली. माझं कुटुंब उद्ध्वस्त झालो होतो. मी ठरवलं होतं की आता फक्त कुटुंबासाठी वेळ द्यायचा. पण दिघे साहेब माझ्याकडे दोनदा, तिनदा, पाचवेळा आले. त्यांनी एकदा मला टेंभीनाक्यावर बोलावलं आणि सांगितलं की आता तुला तुझे अश्रू तर पुसायचे आहेतच, सोबतच जनतेचे अश्रू पुसायचे आहेत.