भाव नसल्याने शेतकर्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकले. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील केकत जळगाव इथं ही घटना घडली. गणेश अजिनाथ थोरे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. योग्या भाव न मिळाल्याने घेतलेले पीक रस्त्यावर फेकून देण्याची वेळ या शेतकऱ्यावर आली. या शेतकर्यांनी ट्रकभर टॉमेटो रस्त्यावर फेकले. त्या ठिकाणावर जनावरे चरताना दिसत आहेत.