पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या सरकारला आशीर्वाद दिले आहेत. कोणतीही कमतरता पडू देणार नाही, असे मोदींनी सांगितल्याने त्यांनी सांगितले, अशी माहिती स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलीयं. तसेच यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी भास्करराव यांच्यावर निशाना साधत म्हटंले की, भास्करराव आम्ही गद्दार नाहीत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 39 आमदारांनासोबत घेऊन बंडखोरी केली. शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आणि कोसळले. आता राज्यात एकनाथ शिंदे गटाने भाजपासोबत सत्तास्थापने केली आहे. पुढच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपाचे 200 आमदार निवडून येतील, असा विश्वासही बोलताना एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. हे सरकार सूडबुद्धीने काम करणार नाही. घेतलेले निर्णय मागे घेणार नाही.