50 Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 5 PM | 7 September 2021
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच मंदिरे उघडण्यावर भाष्य केलं आहे. राज्यातील मंदिरे टप्प्याटप्प्याने उघडण्यात येणार आहे, असं विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच मंदिरे उघडण्यावर भाष्य केलं आहे. राज्यातील मंदिरे टप्प्याटप्प्याने उघडण्यात येणार आहे, असं विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केलं. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या विविध उपक्रमांचा लोकार्पण सोहळा आज पार पडला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मंदिर उघडण्याबाबत भाष्य केलं.
आज मंदिरं जरी बंद असली तरी अत्यावश्यक आरोग्य मंदिरं हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण उघडत आहोत. त्याबद्दल जनता तुम्हाला आशीर्वाद देईल. धार्मिक स्थळं उघडी राहिली पाहिजेत. ठिक आहे. त्यापेक्षा कपिलजी (केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना उद्देशून) तुमच्या परिसरात आरोग्य केंद्र आहे, आज त्याचीच आवश्यकता आहे ना. की आरोग्य केंद्र बंद करून त्याच्याबाजूचं मंदिर उघडू? असा सवाल करतानाच आरोग्य केंद्र महत्त्वाचं आहे. आरोग्याची मंदिरंही महत्त्वाची आहेत. मंदिरंही उघडणार आहोत. पण एका टप्प्याटप्प्याने आपण जात आहोत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
