गेल्या आठवड्याभरापासून महाडमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे दाणादाण उडाली आहे. या पावसामुळे महाडच्या तळीये गावात 35 घरांवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 32 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले आहेत. एनडीआरएफ आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने या ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. गुरुवारी संध्याकाळी ही दरड कोसळल्याची माहिती आहे. 35 घरांवर दरड कोसळलेली आहे.