कणकवली : राज्यात सत्ता पालट झाल्यानंतर आरोप-प्रत्योरपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. आता वैभव नाईकांचा पराभवावरून उदय सामंत यांच्यावर आरोप होत आहेत. खासदार विनायक राऊत यांनी याबाबत आरोप करून खळबळ उडवून दिली आहे. खासदार राऊत यांनी उदय सामंत यांच्यावर आरोप करताना, नारायण राणे आणि त्यांच्या समर्थकांना पोसण्याचे काम उदय सामंत यांनी केल्याचे म्हटलं आहे. तसेच सामंत यांनी वैभव नाईकांचा पराभव करण्यासाठी विरोधी उमेदवाराला उदय सामंतांनी 50 लाख दिल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. तसेच रत्नागिरीत अतिशय घानेरडे राजकारण सामंत करत असल्याचेही राऊत म्हणाले.