आमच्या सर्वोच्च न्यायालयाने 14 फेब्रुवारीला सलग सुनावणीच्या जे तारीख दिली आहे. ती आम्हाला मान्य आहे. या सुनावणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे. लवकरात निर्णय होणं देशाच्या दृष्टीने सर्वात महत्वाचं आहे. 14 फेब्रुवारीला याच्यावर सलग सुनावणी होऊ शकते. त्यामुळे तेव्हा काय होतं हे पाहणं महत्वाचं असेल, असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी आजच्या सत्तासंघर्षावरील (Maharashtra political crisis) सुनावणीवर प्रतिक्रिया दिली आहे.